
भूमिहीन शेतकरी पत्नीच्या खांद्यावरून उतरले जोखड…! लातूर जिल्ह्यातील बोंबळीच्या गायकवाड कुटुंबियांना मिळाला दिलासा वीज पडून दगावलेला बैल, आर्थिक सहाय्यासह, शेतकऱ्याला मिळाला बैल
मुंबई, दि. १०: वीज पडून बैल दगावल्याने जोखडाला पत्नीला जुंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या व्य़थेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, अन् या शेतकरी कुटुंबाला अवघ्या काही तासात बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाई पोटीची रक्कम मिळाली. यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे निर्देश आणि





